kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; तीन जणांचा जागीच मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. मध्यरात्री ३ वाजता हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे आज बुधवारी मध्यरात्री पाच वाहनांचा एक विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले आहेत. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. मध्यरात्री ३ वाजता हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

महामार्गावर भीषण अपघात झाल्याचं समजताच गावकरी घटनास्थळावर धावले. तात्काळ मदतीचा हात पुढे केला. अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पियुष पाटील आणि रुद्र पियुष पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १४ जण जखमी आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.