kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

ती चूक पुन्हा कधी होणार नाही ; पहा शरद पवार नेमकं काय म्हणाले

पाच वर्षांपूर्वी नवनीत राणांना पाठिंबा देऊन चूक केली, असं म्हणत अमरावतीच्या सभेत शरद पवार यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला. तर पाच वर्षांपूर्वीची चूक आता सुधाराची आहे, असेही शरद पवार म्हणाले.

मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, तेव्हा त्या निवडणुकीतील उमेदवाराला मतदान करा म्हणून मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि ज्यांना पाठिंबा दिला, खासदार केलं. पण गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव पाहिल्यावर माझ्या मनात अस्वस्थता होती. की कधी तरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं आमच्याकडून चूक झाली. ती चूक पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे. ती चूक दुरुस्त करण्यासाठी ज्याचं सार्वजिनक आणि व्यक्तिगत जीवन स्वच्छ आहे. अशा बळवंतराव वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे, असे शरद पवार अमरावतीत म्हणाले.