kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था उध्वस्त केली पाहिजे-राज ठाकरे

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या परिसरातील उभारण्याता आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. त्यामुळे फक्त आठ महिन्यातच महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारवर यावरून जोरदार निशाणा साधला आहे.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. त्यासोबतच राज ठाकरे यांनी कुसुमाग्रजांच्या शहरातील ‘पाच पुतळ्यांवरची’ कविताही पोस्ट केली आहे.

पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे. ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो, अशा परखड शब्दात राज ठाकरे यांनी आपली भूमिक मांडली आहे.