kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘’मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर मी राजीनामा देईल’’ ; मंत्री धनंजय मुंडेंचे मोठे विधान

आज दिल्लीला धनंजय मुंडे यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जर मुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. परंतु नैतिकतेतून मी दोषी वाटत नसल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे. “नैतिकतेतून मी दोषी वाटत नाही, पण जर मुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा. मुख्यमंत्र्यांनी तशी मागणी केली तर मी राजीनामा देण्यास तयार आहे,” असे विधान धनंजय मुंडे यांनी केले आहे. ते सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.

ते पुढे म्हणाले, ” प्रल्हाद जोशी हे केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री आहेत. मी राज्यातील महायुती सरकारचा अन्न व पुरवठा मंत्री आहे. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो होतो. तसेच राज्यातील नागरिकांना रेशन मिळण्याबाबत काही समस्या होत्या त्याची माहिती मी त्यांना दिली.

राज्यातील लोकसंख्या वाढली आहे. आता फक्त ७ कोटी लोकांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळतोय. जनसंख्या वाढली तर जास्त लोकांना लाभ मिळाला पाहिजे होता. तसेच जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांची सर्व माहिती द्यावी लागते. त्यात ऑनलाईनची जी समस्या आहेत, त्याची माहितीही आपण केंद्रीय मंत्र्यांना दिली आहे. “