एकीकडे महाराष्ट्राचा बेरोजगार निर्देशांक ७.४% टक्के इतका असून बेरोजगारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. तर राज्यात साडेसात लाख सरकारी पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील उद्योग दिल्लीश्वरांच्या राज्यात नेले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबईतर्फे आज मंत्रालयावर भव्य आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनामुळे सर्व आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू केले आहे.

तथापि सरकारच्या या दबावाला भीक घालणार नसून, रिक्त सरकारी पदे भरेपर्यंत आंदोलनाचे स्वरूप अधिकाधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा याबाबत बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी दिला आहे.