kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबई बोट अपघातात १३ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

मुंबईतील गेट ऑफ इंडियावरुन नीलकमल ही बोट एलिफंटाकडे बुधवारी संध्याकाळी निघाली होती. या बोटीची क्षमत ८० प्रवाश्यांची आहे. परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते. एकूण ११० प्रवाशी बोटीत असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

नीलकमल ही बोट बुधवारी गेट ऑफ इंडियाजवळ समुद्रात बुडाली. या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु नौदलाकडून त्याचा इन्कार करण्यात आला. दरम्यान नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. बोटीची क्षमता ८० असताना त्यातून ११० जण प्रवास करत होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बोट मालकावर गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान या प्रकरणी १३ जणांचा मृत्यू आहे. त्यातील तीन जण नौदलाचे आहे तर दहा नागरिक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अपघातात १०१ लोकांना वाचवण्यात आले आहे. संध्याकाळी ७.३० पर्यंतची ही माहिती आहे. अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही. या घटनेची नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार आहे.

दरम्यान, या बोट अपघातात एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. नाशिक येथील अहिरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात आई, वडील आणि पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. निद्धेश अहिरे असे त्या मुलाचे नाव आहे. हे सर्व जण नाशिकवरून आले होते. परंतु त्यांचे हे शेवटचे पर्यटन ठरले.