kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 25 नवीन चेहऱ्यांना संधी !

विधानसभा निवडणुकीत भरभक्कम बहुमत मिळाल्यानंतर तब्बल २२ दिवसांनी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्राचा अवलंबन झाले. अनेक जुन्या चेहऱ्यांना आणि ज्येष्ठांना घरी बसवण्यात आले आहे. तसेच नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. रविवारी ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे फडणवीस मंत्रिमंडळाची संख्या आता ४२ वर गेली आहे. मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४३ जण असून शकतात.

शिंदे यांच्या मंत्रिमंडळापेक्षा अनेक वेगळी नाव फडणवीस मंत्रिमंडळात आली आहे. एकूण २५ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अशोक उइके, आशीष शेलार, दत्तात्रेय भरणे, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगवले, मकरंद पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आशीष जैस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डिकर, इंद्रनील नाइक यांचा समावेश आहे.

मंत्रिपदाबाबत महायुतीत अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. तिन्ही पक्षाचे नेते या फॉर्म्युलावर तयार झाले. काहींना अडीच अडीच वर्ष संधी देणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.