वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या झपाट्याने वाढू लागल्या आहेत. उन्हाळ्यात लोकांना अनेकदा ॲसिडिटी, अपचन किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. अशातच, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासापासून आराम मिळवण्याचे काही आरोग्यदायी पर्याय सांगितले आहेत.

हंगामी फळे खा

टरबूज, खरबूज किंवा काकडी यासारखी हंगामी फळे सकाळी 11 च्या सुमारास खा. हे फळ घामामुळे शरीरातून निघून गेलेले द्रव भरून काढण्यास मदत करते. या फळांमध्ये जास्त प्रमाणात पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि उष्णतेपासून दूर राहण्यासाठी आपण पुरेसे पाणी सेवन करणे आणि आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेल्या पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे. ऋजुता दिवेकर कायमच त्या त्या हंगामातील प्रादेशिक फळांना प्राधान्य दिलं आहे.

दुपारी दही भात खा

दही-भात, एक पारंपारिक भारतीय डिश, गरम दिवसांमध्ये आपल्या पोटासाठी एक थंड आणि हलके जेवण आहे. दही त्याच्या थंड गुणधर्मांसाठी ओळखले जाते आणि जेव्हा भातामध्ये मिसळले जाते तेव्हा ते एक संतुलित जेवण बनते, जे पचण्यास खूप सोपे आहे. दुपारच्या जेवणात लोणचं किंवा पापड सोबत खाऊ शकता. लोणचे किंवा पापड खाल्ल्याने तुमच्या जेवणाची चव तर वाढतेच पण त्याचबरोबर जेवणात चटपटीतपणा किंवा कुरकुरीतपणा येतो.

गुलकंद पाण्याचे फायदे

पाण्यात मिसळलेले गुलकंद हे आरोग्यदायी आणि चवदार पेय आहे, जे शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. गुलकंद त्याच्या थंड गुणधर्मांसाठी ओळखला जातो आणि बर्याचदा उष्णतेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी वापरला जातो. रात्री झोपण्यापूर्वी गुलकंद पाण्याचे सेवन केल्याने केवळ ताजेतवाने होत नाही तर पचनक्रियेतही मदत होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

उन्हाळ्यात हे पदार्थ खाण्याचे फायदे

ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळेल

पोट फुगण्याची समस्या दूर होते

सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो

थकवा दूर करण्यासाठी फायदेशीर