२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातील १० दहशतवाद्यांनी एकाच वेळी मुंबईवर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये १६६ लोकांचा मृत्यू झाला होता तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्याला १६ वर्ष पूर्ण झाली असून देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत आदरांजली अर्पण केली आहे.

मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतमातेच्या वीरपुत्रांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आदरांजली!