kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये 7-8 बॅगा; त्यात 500 सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून जड बॅगा उतरवितानाचा व्हिडीओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. नाशिक आणि कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून पोलिसांना उचलताना नाकीनऊ येतील एवढ्या वजनाच्या बॅगा आणल्या होत्या, त्या बॅगा कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, कुठे त्यातील पैसे वाटले गेले याचे व्हिडीओ लवकरच बाहेर आणू असा दावा राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रातल्या ज्या भागात आज निवडणुका आहेत, संभाजीनगर असेल महत्त्वाचा पुणे आहे इतर अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पैशाचे वाटप, पैशाची आवक जावक ही स्पष्ट दिसत आहे. धंगेकर जे पुण्याचे उमेदवार आहेत ते पोलीस स्टेशन समोर धरणे धरून बसले होते. पोलिसांच्या मदतीने पैशाचे वाटप होत आहे. नरेंद्र मोदींनी जरा बघा, नुसते ज्ञान देऊ नका फडणवीस गृहमंत्री आपण जरा पाहा. नगरमध्ये खुल्या पैसे वाटताना लोकांनी पकडले आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

नाशिकमधला मुख्यमंत्री यांच्या आगमनाचा एक व्हिडिओ मी ट्विट केला. दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत. 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या. त्या बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या तिथून कोणाला वाटत गेले, हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकर देत आहोत, असे राऊत यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या चार फाईल असतील. ते पण आता आचारसंहिता असताना सही करू शकत नाहीत. आमच्या गाड्या तपासल्या जात आहेत मल्लिकार्जुन खरगे यांचं हेलिकॉप्टर तपासलं जात मी सांगलीत गेलो माझ्या हेलिकॉप्टरचे देखील तपासणी झाली. मुख्यमंत्री प्रधानमंत्री गृहमंत्री त्यांचे मंत्री हे जे खोके आणि बॉक्स घेवून उतरत आहेत त्यांची तपासी कोण करणार, इलेक्शन कमिशनच्या डोळ्यावर झापड आली आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

ईडी ही नरेंद्र मोदी यांची गँग आहे. लुटारू टोळी आहे. कितीही पाऊस पाडू द्या उन्हाळ्यामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव हा ठरला आहे. हेलिकॉप्टरची झडती झाली असती तर 9 बॅगा उतरल्या नसत्या. किमान 12 ते 13 कोटी रुपये नाशिकमध्ये आले. छत्रपती शाहू महाराज यांचा पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे हे किमान 15 ते 20 सुटकेस घेऊन हॉटेल शालीमारला थांबले होते. त्यांनी पैशाचे वाटप केले होते, असा आरोप राऊत यांनी शिंदे यांच्यावर केला आहे.