मागच्या दहा वर्षांत देशाने गतीने प्रगती केली आहे. हे एकटा मी म्हणत नाही तर सगळं जग गाजावाजा करुन ही बाब सांगते आहे. प्रत्येक क्षेत्रात भारताच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. एक मोठा संकल्प आणि प्रत्येक भारतीय जोडला गेला आहे. त्यामुळे आपला देश छोटी स्वप्न पाहू शकत नाही आणि संकल्पही छोटे करु शकत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्याला भारत विकसित देश करायचा आहे हे आपलं स्वप्न आहे. यासाठी पुढच्या पाच वर्षांची खूप मोठी भूमिका असणार आहे. पुढच्या पाच वर्षांत आपल्या विकसित भारतासाठी एक प्रचंड हनुमान उडी घ्यायची आहे. आपल्याला जर अशी हनुमान उडी घ्यायची असेल तर सरकारमध्ये भाजपा परत येणं आवश्यक आहे हे विसरु नका असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

आज विरोधी पक्षातले नेतेही एनडीए सरकार चारशे पार चे नारे देत आहेत. हे लक्ष्य गाठायाचं असेल तर भाजपाला ३७० जागा जिंकाव्याच लागतील. अनेकदा लोक मला सांगतात तुम्ही इतकं सगळं केलंत आता कशाला धावपळ करता? त्यावर मी सांगतो दहा वर्षात निष्कलंक कार्यकाळ आपण दिला आहे. २५ कोटी लोकांना आम्ही गरिबीतून बाहेर काढलं आहे. आपण आपल्या देशाल्या महाघोटाळ्यांमधून आणि दहशतवादी हल्यांमधून मुक्ती दिली आहे. आपण गरीब आणि मध्यमवर्गीयांचं आयुष्य यांचा स्तर उंचावून दाखवला आहे. जे म्हणतात हे सगळं खूप झालं त्यांना एक घटना सांगतो.