kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

… आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

“अजितदादांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. मी व्यक्तिश: माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. दादांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत. अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य आपण जपूया. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत,” अशी विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना केली आहे.