kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस ; वाचा अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे आणि घोषणा

महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (6 मार्च 2026) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प अजित पवारांना समर्पित असल्याचं म्हटलं. तसेच अजितदादांचं स्मारक उभारण्यात येणार असून अजित पवारांच्या नावे गतीमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणांवर एक नजर टाकुयात…

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवण्याचे आम्ही आश्वासन दिले होते. त्यासाठी समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पिककर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून एक मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधीची तरतूद करणार आहे. भरीव निधीची तरतूद करुन ही योजना अधिक सक्षमपणे राबवण्याचा संकल्प केला.