kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अरावली पर्वतरांगांसंबंधी सुप्रीम कोर्टाची स्थगिती हा मोठा पण तात्पुरता दिलासा – आदित्य ठाकरे

अरावली टेकड्या आणि पर्वतरांगांसंबंधीच्या नव्या व्याख्येवरून निर्माण झालेल्या वादाची दखल स्वतः सुप्रीम कोर्टाने घेतली होती. सुप्रीम कोर्टाने २० नोव्हेंबरला अरावली टेकड्या आणि पर्वतरांगांची नवी व्याख्या स्वीकारली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने आज आपल्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच या प्रकरणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाची स्थगिती म्हणजे मोठा पण तात्पुरता दिलासा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

The stay order from the Hon’ble Supreme Court for the Aravalli Range is a huge but temporary relief. It’s important to seal this permanently.

This wasn’t possible without the mass movement of citizens in Rajasthan, who showed that what matters is our planet, not the dirty…

— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 29, 2025