मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी अजित पवारांचे निधन झाल्यानंतर काही दिवसात ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा दिल्याचे प्रकरण समोर आले. यातील २५ शाळा एकाच संस्थेच्या आहेत. अजित पवारांनी या फाईल्स रोखून ठेवल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यावर सह्या केल्या गेल्या.
या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली असून, या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी परस्पर शाळांना अल्पसंख्यांक दर्जाचे वाटप केल्याच्या प्रकरणावरून विरोधकांनीही सरकारला घेरले आहे.












