भाजपाचे काँग्रेसीकरण झालंय, हे चांगले आहे, अशी टीका काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी केली आहे. काँग्रेसच्याच उमेदवारांना घेऊन तिकीट दिली आहेत, त्यामुळे भाजपाने त्याचे आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला देखील विश्वजीत कदम यांनी भाजपला दिला आहे.
भाजपाचे काँग्रेसीकरण झालंय, हे चांगले आहे, अशी टीका काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी केली आहे. काँग्रेसच्याच उमेदवारांना घेऊन तिकीट दिली आहेत, त्यामुळे भाजपाने त्याचे आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला देखील विश्वजीत कदम यांनी भाजपला दिला आहे. त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी महायुतीतल्या नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्रिमंडळात एकमेकांच्या मांडीला-मांडी लावून बसायचं आणि निवडणुकीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचे, हे जनतेला सगळं कळतंय, असा टोला देखील विश्वजीत कदम आणि भाजपाला लगावला आहे, ते सांगलीमध्ये काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभे प्रसंगी बोलत होते.















