kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘मी पुरता अडकलो अन् जिनिलियाच्या सांगण्यावरुन जितुला फोन केला…’ ; नेमकं काय म्हणाले रितेश देशमुख ?

रितेश देशमुखचं दिग्दर्शन आणि अभिनय असलेला ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे. 1 मे रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तब्बल 100 कोटी रुपयांचं बजेट असणाऱ्या या चित्रपटातील हिंदी आणि मराठी कलाकारांच्या भूमिकांचीही चर्चा रंगलीय. महेश मांजरेकर यांच्यासह जितेंद्र जोशीही महात्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची सध्या प्रचंड आतुरता आहे. दरम्यान, रितेश देशमुखने अलीकडेच अभिनेता जितेंद्र जोशीचं कास्टिंग कसं करण्यात आलं, त्याबद्दल सांगितलंय. जितु जोशीच्या कास्टिंगचा किस्सा रितेशने सांगितलाय, त्याची सध्या एकच चर्चा आहे. एका रात्रीत जितु भूमिकेसाठी तयार झाल्याचं सांगत त्याने जितेंद्र जोशीचं कौतुक केलं.

काय म्हणाले रितेश देशमुख?

जितेंद्र जोशीच्या कास्टिंगच्या वेळी काय झालं होतं, हे सांगताना रितेश म्हणाला, ” मला कौतुक करावसं वाटतं जितेंद्र जोशींचं. हा चित्रपट जेंव्हा होत होता, सेट बांधला होता. त्या सेटचे दोन दिवस राहिले होते. एका कलाकाराच्या तारखा जुळल्या नाहीत, काही कारणाने ते जमलं नाही. आणि मी अडचणीत पडलो. कारण मला तो सेट पडून दुसरा बांधायचा होता. आणि मला सुचलंच नाही कारण, ती भूमिका महत्वाची होती. मग, जेनेलिया म्हणाली की, जितेंद्र जोशींना विचारुया. त्यावर मी म्हणालो,’ एवढं उशिरा कसं विचारणार? उद्या शुटींग आहे. ती म्हणली,’ विचारून तर बघा’ मी फोन केला, म्हटलं जितु कुठंय. त्यावर तो म्हणला, ‘ इथेच आहे की भाऊ’ मी म्हटलं की मी अडकलोय, आणि मला एक मदत पाहिजे.’ तो म्हणाला काय पाहिजे? मी सांगितलं की एक भूमिका आहे. महात्वाचीय. आणि ती भूमिका तुम्ही करावी असं मला वाटतंय.

जीतुने विचारलं,” कधी आहे?’ मी म्हणलं, ‘ उद्या आहे’ आणि मी संध्याकाळी फोन केला होता. तो म्हणाला ‘उद्या!!’ लुक टेस्ट वगैरे कधी?.. मी म्हटलं लुक टेस्ट आज करावी लागेल. तो म्हणाला’ चल डन’.. एका फोनवर त्या माणसाने माझ्यासाठी इतकं करणं ही फार मोठी गोष्ट होती. एवढ्या सगळ्या कलाकारांना घेऊन मी सिनेमा बनवतोय…हे त्यांचंही प्रेम आहे. याचबरोबर एवढ्या वर्षांनी हा योग जुळून आलाय…हा महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही.” असं रितेश म्हणाला.

दरम्यान, ‘वेड’मधून अभिनेता रितेश देशमुखनं दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्या सिनेमा प्रचंड गाजला. त्याचा आगामी सिनेमा ‘राजा शिवाजी’मुळे चर्चेत आहे. या सिनेमात रितेशनं दिग्दर्शक म्हणून भूमिका बजावली आहेच, पण त्यासोबतच या सिनेमात त्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिकासुद्धा साकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *